श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर

स्थापना : १९६०

आमच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मूळची गाळप क्षमता प्रतिदिन १०१६ मे.टन. एवढी होती. त्यामध्ये वाढ करून गाळप हंगाम सन १९८७-१९८८ मध्ये गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मेट्रिक टन इतकी करण्यात आली. त्यानंतर देशाचे नेते पद्मविभूषण मा.खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार सन २००७-२००८ मध्ये ३० केएलपीडी क्षमतेची अत्याधुनिक डिस्टिलरी उभारण्यात आली व सन २०१०-२०११ मध्ये महत्त्वाकांक्षी १८ मेगावॅट क्षमतेच्या कोजनरेशन प्रकल्पाची याचबरोबर बायोगॅस निर्मिती तसेच प्रदूषण नियंत्रण योजना व कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पांची देखील उभारणी केली.

कारखान्याने हे करत असतानाच कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस उपलब्ध होता तो जास्तीचा ऊस गाळप करण्यासाठी कारखान्याचे मार्गदर्शक राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्यांदा विस्तारवाढ करून कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन इतकी करण्यात आली.

आदरणीय अजितदादा व पवार कुटुंबीय यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळात दोन भव्य देखण्या इमारतींची भर पडली असून यामध्ये आमच्या संभासदांच्या व बाहेरील मुलींसाठी मुक्कामी राहणेसाठी आम्ही भव्य गर्ल्स हॉस्टेल इमारतीची उभारणी केली असून त्याचसोबत प्रशस्त सायन्स कॉलेज इमारतही बांधलेली आहे. सोबत आपल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही १ बीएचकेचे ९६ फ्लॅट्सचे बांधकाम सुरू केले असून लवकरच या ६ इमारती आमच्या कामगार बांधवांच्या निवासस्थानासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. यासोबत कारखान्याची नविन कामगार पतसंस्था इमारतही आम्ही उभारली आहे.

Scroll to Top